Anganwadi Bharti 2025 :तुम्ही 12वी उत्तीर्ण महिला आहात का? आणि सरकारी नोकरीची संधी शोधताय? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! अंगणवाडीमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या वर्षी 2025 मध्येही हजारो महिला कामासाठी पात्र ठरणार आहेत.यासाठी केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात येणार आहेत.
येथे सर्व रिक्त असणाऱ्या जागा भरल्या जाणार आहेत.येथे थेट उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे अथवा थेट मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून महिलांना नोकरीसाठी संधी चालून आलेली आहे. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा आणि यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
Anganwadi Bharti 2025
तुम्ही या भरतीसाठी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ध सादर करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार नाही. त्यामुळे सर्व बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. ही भरती प्रक्रिया त्या विभागाच्या माध्यमातून संबंधित भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया करण्यासाठी उमेदवारांना 25 जून 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
ही संधी नेमकी कोणासाठी?
ज्यांना समाजसेवेची आवड आहे, मुलांमध्ये काम करायला आनंद वाटतो आणि एक स्थिर नोकरी हवी आहे – त्यांच्यासाठी ही संधी खास आहे.अंगणवाडी भरती ही मुख्यतः ग्रामीण आणि शहरी भागातील 12वी पास महिलांसाठी असते. अंगणवाडी सेविका, मदतनीस अशा विविध पदांसाठी अर्ज मागवले जातात.
अर्जासाठी पात्रता काय आहे
- अर्ज करण्यासाठी किमान 12वी उत्तीर्ण .
- वयमर्यादा: साधारणतः 18 ते 35 वर्षे (आरक्षणानुसार सूट लागू).
- लिंग: केवळ महिला उमेदवार पात्र.
- स्थानिक राहिवासी असणे आवश्यक: अर्ज करताना त्या गाव/वार्डची रहिवासी असणे आवश्यक असते.
पुढील 100 दिवसांमध्ये राज्य सरकारकडून राज्याच्या सर्वच विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस भरती वनरक्षक भरती जिल्हा परिषद भरती तसेच उर्वरित एमपीएससीच्या भरत्या सर्व स्तरावर राज्य सरकारकडून रिक्त पद भरण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे यासोबतच पुढील महिनाभरात “मिशन 100 दिवस” च्या राज्यभरातील दीड लाख पदे भरण्यात येणार आहे.
त्यामुळे राज्यभरातील सर्व तरुणांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. सध्या देशभरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु महाराष्ट्र सरकारकडून रिक्त असणाऱ्या सर्व सरळ सेवा पदांची भरती हळूहळू जाहीर करण्यात येत आहे. यामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या तरुण आणि तरुणींना सुवर्णसंधी चालून आलेली आहे.
लागणारी कागदपत्रे
- रहिवासी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (असल्यास)
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधार/पॅन कार्ड)
- अर्ज सादर करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा .
अर्ज कसा करायचा
- एकात्मिक बालविकास आणि सेवा प्रकल्प माध्यमातून.
- अंगणवाडी भरती 2025 विभागात जाऊन अर्ज फॉर्म भरावा.
या भरतीच्या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना अहिल्यानगर महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.महिला व बाल विकास विभागाद्वारे भरती प्रक्रिया पार पाडण्यात येईल.सर्व पदांवर मानधन आधारीत पगार दिला जातो, जो राज्यनिहाय वेगळा असतो. सोबतच, वेळोवेळी प्रशिक्षण, सन्मानपत्रे आणि सरकारी योजना लाभ घेण्याची संधीही मिळते.

निष्कर्ष:अश्याप्रकारे घरापासून जवळची सरकारी नोकरी हवी असेल, तर अंगणवाडी ही एक उत्तम संधी आहे. 12वी पास महिलांनी ही सुवर्णसंधी चा लाभ नक्की घ्यावा.आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा .