Railway Recruitment 2025: सरकारी नोकरी म्हणजे केवळ पगार नसून ते स्थैर्य, मान आणि कुटुंबासाठी खूप मोठा आधार असतो. रेल्वे भरतीसारख्या मोठ्या संधी कधी सहज येत नाहीत.म्हणून ही आपल्यासाठी सुवर्णसंधीच आहे. रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण.जाणून घेऊ सविस्तर माहिती.
भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत भरती पोर्टल www.rrbapply.gov.in यावर दिली आहे.या पदांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया येत्या 28 जून 2025 पासून सुरू होणार असून 28 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवली आहे.या भरती अंतर्गत 180 पदे ही तंत्रज्ञ ग्रेड 1 सिग्नल या पदांसाठी राखीव ठेवणार आहेत.
रेल्वेने या भरती मोहिमे अंतर्गत संपूर्ण भारतात 6 हजार 180 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या तर बाकीची 6 हजार पदे ही तंत्रज्ञ ग्रेड 3 पदासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. रेल्वे भरती मंडळ (RRB) ने तब्बल 6 हजार पदांसाठी नोकर भरती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणकोणती पदे उपलब्ध
- क्लर्क (Clerk)
- टेक्निशियन (Technician)
- रेल्वेकडून सध्या जाहीर झालेली भरती वेगवेगळ्या विभागांमध्ये आहे. यामध्ये काही महत्त्वाची पदं:
- गुड्स गार्ड
- ट्रॅक मेंटेनर
- असिस्टंट लोको पायलट (ALP)
- स्टेशन मास्टर (SM)
शैक्षणिक पात्रता
साधारणतः या भरतीसाठी 10वी, 12वी पास किंवा ITI/डिप्लोमा/ग्रॅज्युएशन केलेले उमेदवार पात्र असतात.नेमकी पात्रता निकष पदांनुसार वेगवेगळं असतं, त्यामुळे जाहीरात नक्की वाचा.
संबंधित विषयात अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे किंवा टेक्निशयन ग्रेड 1 सिग्नल पदासाठी उमेदवाराकडे भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, इन्स्टमेंटेशनलमध्ये विज्ञान यामध्ये पदवी असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 29,200 रुपये मासिक वेतन आणि 7 व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार सरकारी फायदे – पीएफ, मेडिकल, ट्रॅव्हल पास ह्या सुविधा आहेत.
अर्ज कसा करायचा?
- रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जा (उदा. www.rrb.gov.in)
- हवी ती भरती निवडा.
- आपली माहिती भरा – नाव, पत्ता, शिक्षण, ओळखपत्र
- आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
- अर्जाची फी भरा (SC/ST/महिला/अपंगांसाठी सवलत).
- फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट घ्या.
अर्ज करण्याची तारीख
28 जून 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून 8 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे वेळ हातातून जाऊ देऊ नका ,लगेच संधीचा लाभ घ्या.
निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा काम करता येणार
रेल्वेकडून सांगण्यात आले की,रेल्वेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सोपी करून कार्यक्षमता वाढवणे आणि अनुभवी कर्मचाऱ्यांमार्फत सेवा सुधारण्यासाठी याची मदत होणार आहे यामुळे हा निर्णय घेतला आहे.रेल्वेच्या या निर्णयामुळे राजपत्रित नसलेल्या कर्मचाऱयांना निवृत्तीनंतरही रेल्वेत काम करता येईल. रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीची असेल.
निष्कर्ष: अशाप्रकारे योग्य तयारी, योग्य माहिती आणि योग्य वेळी निर्णय घेतला, तर रेल्वेची नोकरी फक्त स्वप्न न राहता वास्तव ठरू शकेल.आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.